जी.के. ऐनापुरे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
जी.के. ऐनापुरे

जी.के. ऐनापुरे (घ.के. ऐनापुरे) यांनी दीर्घकथा आणि कादंबरी या साहित्यप्रकारात लेखन कामगिरी केलेली आहे. याचबरोबर समीक्षालेखन आणि चित्रपटांविषयीही त्यांनी लेखन केलेले आहे.

गडहिंग्लज तालुक्यातील ऐनापूर हे ऐनापुरे यांचे मूळगाव. त्यांचे वडील मुंबईला गिरणी कामगार असल्याने त्यांची जडणघडण मुंबईतच झाली.

ऐनापुरे यांनी समुद्रविज्ञान विषयातून पदव्युत्तर शिक्षण घेतलेले आहे. सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ येथील महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून त्यांनी काम केले.

मुंबईमधल्या गिरण्यांचा संप आणि एकेक करून गिरण्या बंद होत लाखो गिरणीकामगार आणि त्यांचे कुटुंबीय उद्ध्वस्त, बेघर होत जाणे, या भयानक घटनेभोवती जी.के. ऐनापुरे यांचे बरेचसे साहित्य फिरताना दिसते. ऐनापुरे यांच्या अनेक कथांत कामगारांच्या खेळांचा संदर्भ येतो. कांदाचिर, रिबोट ही पुस्तकांची नावेदेखील खेळांशी संबंधित आहेत.

ऐनापुरेंच्या लेखनाचा परिचय[संपादन]

ऐनापुरे यांचे प्राथमिक कथालेखन १९८३ला सुरू झाले असले तरी त्यांचे व्यापक कथालेखन १९९५ पासून सुरू झाले. रिबोटला मिळालेल्या महाराष्ट्र फाऊंडेशनसकट इतर पुरस्कारांनी ऐनापुरे यांचे नाव साहित्यक्षेत्रात चमकू लागले.

प्रकाशित साहित्य[संपादन]

  • अधुरा (कादंबरी, इ.स. २००६)
  • अभिसरण (कादंबरी, इ.स. २००२)
  • अवकाश (इ.स. १९९७)
  • कांदाचिर (दीर्घकथासंग्रह, इ.स. २००५)
  • जाईच्या घरी जाई (इ.स. २०१०)
  • झिंझुरडा (कथासंग्रह, इ.स. २०१२)
  • रिबोट (कादंबरी, इ.स. २००८)
  • सर्पसावल्या (या कथासंग्रहाची नवी आवृत्ती 'खंगोल' या नावाने २०१० साली आली)
  • स्कॉलर ज्यूस (कथासंग्रह, इ.स. २०१६)
  • निकटवर्तीय सूत्र (कथासंग्रह,२०१७)
  • घनसाळ ( दीर्घकथासंग्रह, २०१७)
  • चिंचपोकळी (कथासंग्रह,२०१९)
  • ओस निळा एकान्त (कादंबरी, इ.स. २०२२)
  • नासमाया (दीर्घकथासंग्रह,२०२३)

समीक्षा[संपादन]

  • चारुता सागर : दुःखाचा गिरव (२०१९)
  • ग्रेसची कविता : अर्थबोधाचे तपशील (समीक्षा) २०१५
  • मराठी कथा : मूल्य आणि -हास (समीक्षा, इ.स. २०१६)
  • सूर्याचे सांगाती (बाबुराव बागुल यांच्या असंग्रहित कथांचे संपादन) २०२१

पुरस्कार[संपादन]

  • 'कांदाचिर' या दीर्घकथा संग्रहासाठी 'शंकरराव खरात पुरस्कार' (२००५)
  • शब्दवेध सन्मान (२००८)
  • बाबुराव बागुल  पुरस्कार (२००९)
  • 'रिबोट' या कादंबरीसाठी 'महाराष्ट्र फाऊंडेशनचा पुरस्कार' (२०१०)
  • मराठी  कथेतील योगदानासाठी 'सार्वजनिक वाचनालय, नाशिक' पुरस्कार (२०११)
  • 'जाईच्या घरी जाई' या कादंबरीसाठी 'डॉ. भाऊसाहेब नंदुरकर पुरस्कार (२०११), महाराष्ट्र राज्य पुरस्कार (२०१२)
  • 'ओस निळा एकान्त' या कादंबरीसाठी 'लोकमत पुरस्कार (२०२४)

सन्मान[संपादन]

  • अध्यक्ष, दुसरे ग्रामीण साहित्य संमेलन, मळणगाव (२००३)
  • अध्यक्ष, दुसरे मराठी साहित्य संमेलन, कापूसखेड, इस्लामपूर (२०१२)
  • अध्यक्ष, २३ वे विभागीय मराठी साहित्य संमेलन, इस्लामपूर (२०१४)
  • अध्यक्ष, फुले, आंबेडकरी साहित्य संमेलन, वैभववाडी, जि. सिंधुदुर्ग (२०१७)
  • अध्यक्ष, ७ वे सम्यक साहित्य संमेलन, पुणे (२०१९)

मुलाखती[संपादन]

  • ‘खंगोल’मध्ये आत्माराम आठवले यांनी जी.के. ऐनपुरे यांची प्रदीर्घ मुलाखत छापली आहे.
  • व्यवस्थेच्या दारावर लेखक टाचा घासून मेला पाहिजे.. या नावाने २००५ साली एका पुस्तिकेच्या रूपात प्रकाशित झालेली डॉ. मोहन पाटील आणि प्रा. यशवंत चव्हाण यांनी घेतलेली ऐनापुरे यांची मुलाखतही उपलब्ध आहे.

अनुवाद[संपादन]

'रिबोट' या कादंबरीचा कन्नड अनुवाद (सृष्टी प्रकाशन, बेंगलोर, २०१०).


विशेषांक[संपादन]

बुतुफु, जी. के. ऐनापुरे विशेषांक (जानेवारी २०२४ / संपादक, चंद्रकांत बाबर)

संदर्भ[संपादन]

जी.के. ऐनापुरे Archived 2016-04-11 at the Wayback Machine.